
Supreme Court
sakal
न्यायालयाने धार्मिक स्वातंत्र्याचा आदर केला, मात्र धार्मिकतेचा आधार घेतला, की त्यातील प्रत्येक गोष्टीला विशेषाधिकाराची कवचकुंडले लाभतात, या समजुतीतील फोलपणाही दाखवून दिला.
भारतात धर्मनिरपेक्षता या मूल्याचा आजवर राजकीय पक्षांनी जेवढा विपर्यास केला गेला, तेवढा क्वचितच कुठे केला गेला असेल. एखाद्या धार्मिक समाजाचा एकाने अनुनय करणे आणि दुसऱ्याने विरोध वा द्वेष करणे, अशा प्रकारच्या राजकारणात याशिवाय दुसरे काही घडणे शक्य नव्हते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी संसदेत वक्फ कायदा संमत करताच त्यावरून वादळ उठणार हे अपेक्षित होते.