T20 Cricket World Cup India vs pakistan
sakal
editorial-articles
अग्रलेख : क्रिकेटचे ‘बेनूर बाजीगर’!
‘जिंकण्याची आस नाही, हारण्याची खंत नाही’ अशा बधिरावस्थेत पाकिस्तानचा क्रिकेट संघ पोचला असावा.
पाकिस्तानी क्रिकेटला नव्या सहस्रकात येता येता ग्रहण लागले, ते बव्हंशी क्रिकेटबाह्य कारणांचे.
‘जिंकण्याची आस नाही, हारण्याची खंत नाही’ अशा बधिरावस्थेत पाकिस्तानचा क्रिकेट संघ पोचला असावा. निदान रविवारी कोलंबोत झालेल्या टी-२० विश्वकरंडकाच्या लढतीत पाकिस्तानी संघाने भारताकडून जो बेदम मार खाल्ला, त्यावरून तरी असेच वाटते.
