idian champions t20 cricket world cup
sakal
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही भारतीय संघ क्रिकेट विश्वातला अग्रणीच होता. स्पर्धेनंतर त्याचे रूपांतर महासत्तेत झाले, असे म्हणता येईल.
जुन्याजाणत्यांच्या अनुपस्थितीत नुकत्याच हाताबुडी आलेल्या पिढीने घराणे, शेतीवाडी आणि वाड्याहुड्यांची निगुतीने जपणूक करावी, नव्हे, त्यावर सोन्याची कौले चढवावीत, हे बघितले की वाडवडलांना मोठे सौख्य मिळते. हे कृतकृत्यतेचे सौख्य भारतीय क्रिकेटप्रेमींना गेल्या २३ महिन्यांत पुरेपूर मिळाले आहे.