bjp party
sakal
ग्रामीण मतदारांनी सत्ताधारी महायुतीवर, विशेषतः भाजपवर विश्वास दाखवला आहे. एकेकाळी भाजपवर असलेला ‘शहरी पक्ष’ हा शिक्का पुसला जाण्यास हा निकाल सहाय्यभूत ठरणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाने भारतीय जनता पक्षाचे राजकीय वर्चस्व ठळकपणे अधोरेखित केले आहे. या निवडणुका केवळ स्थानिक संस्थांच्या नव्हत्या, तर राज्याचा कल कोणत्या दिशेला आहे हे ठरवणाऱ्या होत्या.