
टळटळीत दुपार होती. म्हणजे रामराणा जन्मला ती वेळ. इतिहासपुरुष श्वास रोखून बैसला होता. ऐतिहासिक घडना घडली रे घडली की ती मराठीत लेहून काढायची, हे त्याचे विहीत कार्य तो नेमाने पार पाडीत होता. त्याचे सारे लक्ष शिवाजी पार्काच्या काठावरील ‘शिवतीर्थ’गडावर लागले होते. राजियांचा आदेश सुटला आणि महाराष्ट्रसैनिकांच्या फौजा बँकांकडे चौटाप उधळल्या. ‘‘बँकाबँकांत जा, पेढीपेढीत जा, जेथ मऱ्हाटी भाषा बोलली जात नाही, तेथे चांगली जरब बसवा. नच ऐकल्यास बँकांमध्ये काचा आणि कुंड्या कमी नाहीत. तेही नसल्यास गाल नावाचा अवयव हरेक गनिमांस असतोच.