आयुष्य कोबीच्या भाजीसारखे बेचव झाले होते. पण युध्द सुरु झाले तेव्हा अचानक तात्यांना, आपल्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची मात्रा भरपूर झाल्याप्रमाणे उत्साह आला. ८६ तास टीव्हीसमोर बसून तात्यांनी युद्ध खेळले. तहानभुकेची शुद्ध नव्हती. आंघोळीला तर वेळही नव्हता.