

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : त्रेतायुगातली.
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणाने आपल्या अंत:पुरात येरझारा घालत आहेत. राजवाड्यात सामसूम आहे. ‘एवढी सामसूम का? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत आहे. विचारमग्न अवस्थेत ते गालिच्यात पायाचा अंगठा सापडून ठेचकाळतात. काही शब्द हवेत उमटतात. विरतात. अब आगे…
उधोजीराजे : (संतापून) कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (अंत:पुरात प्रवेश करुन लगोलग मुजरा करत) मीच आहे, महाराज! आपण म्या पामराचे स्मरण केलेत?