कबुतरांमुळे रोगराईस आमंत्रण मिळते. श्वसनाचे विकार उद्भवतात. तथापि, मुंबई आणि अन्य भागातील कबुतरखान्यांचे उच्चाटन टप्प्याटप्प्याने करावे, हे ठीकच आहे. कां की, कबूतरखाने बंद केल्यास, दयाळू मुंबईकरांच्या भूतदयेवर जगणारी लाखो कबुतरे कुठे जातील? पंख असले म्हणून काही पक्षी सतत अस्मानात उडत नाहीत.