

ढिंग टांग
माझ्या घराण्यातला शेवटला राजकारणी मीच आहे, असे आमचे परममित्र रा. श्री. नानासाहेब फडणवीस यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हे अतिशय स्फोटक विधान त्यांनी मुंबईत नव्हे, तर भर नागपुरात केले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाने निराळेच वळण घेतले आहे. सर्व पक्षातील नेते हादरले. आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला. नानासाहेबांच्या घराण्यातले ते लास्ट रोमन असतील तर महाराष्ट्रातल्या इतर रोमनांचे काय होणार? असा सवाल उपस्थित झाला.