

प्रिय मित्रवर्य कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांसी, दिवसभर एकत्र होतो, पण आपले बोलणे झाले नाही. एकदा माझ्याकडे बघून हसल्यासारखे वाटलात, पण निरखून पाहिले तेव्हा तुम्ही गाल खाजवत होता. रागावलात का? नाराज नाही ना? माझं काही चुकलं असेल तर तोंडावर सांगा. कारण ‘भाईसाहेब माझ्यावर नाराज आहेत का?’ असं मी आदरणीय नानासाहेब फडणवीस यांना विचारलं, तर ते म्हणाले की, ‘‘छे, माझ्याकडे तरी तसा तक्रारअर्ज आलेला नाही!’’