एमबीबीएस, बीडीएस पहिल्या फेरीतील प्रवेश स्वीकारताना

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील प्रवेशाची पहिली फेरी www.mahhacet.org या संकेतस्थळावर जाहीर झालेली असून, प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी १९ जुलैपर्यंत प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. यंदाची प्रवेशप्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईअंतर्गत दोन टप्प्यांत राबविली जाणार असून, पहिल्या टप्प्यात फक्त एमबीबीएस व बीडीएस शाखेतील प्रवेशासाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून पहिली फेरी जाहीर झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यात बीएएमएस, बीएचएमएससह उर्वरित शाखांसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, त्या संदर्भात संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

प्रवेश घेतानाची दक्षता
१) एकदाच नोंदवून घेण्यात आलेल्या पसंतीक्रमाचा वापर सर्व फेऱ्यांसाठी केला जातो. पहिल्या फेरीमध्ये अथवा त्या पुढील कोणत्याही फेरीमध्ये प्रथमच मिळालेला प्रवेश घ्यावाच लागतो. सदरचा प्रवेश नाकारल्यास म्हणजेच न घेतल्यास संबंधित विद्यार्थी यंदाच्या एमबीबीएस, बीडीएस प्रक्रियेतून कायमचा बाहेर फेकला जातो.
२)     विद्यार्थ्याच्या लॉगइनमधून मिळालेल्या प्रवेशाची प्रिंट घ्यावी, ती उपलब्ध नसल्यास जाहीर झालेल्या एकत्रित यादीतील ज्या पानावर आपले नाव व वाटप दिसत आहे, त्या पानाची प्रिंट घ्यावी. 
३)     प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाचे शुल्क पाहावे, तसेच संपर्क साधून प्रवेशासाठी किती रकमेचा डीडी आवश्‍यक आहे याची चौकशी करावी. सदरची चौकशी करताना आपला प्रवेश कोणत्या प्रवर्गातून आहे, याची स्पष्ट कल्पना त्यांना द्यावी. त्यानुसार किती शुल्क लागते हे पाहावे.
४)     योग्य त्या रकमेचा डीडी व यापूर्वी कागदपत्र तपासणीच्या वेळी लागलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रती व त्यांच्या एक छायांकित प्रतीचा संच तयार ठेवावा. यापूर्वी कागदपत्र तपासणीच्या वेळी प्राप्त झालेली शासकीय पावती सोबत ठेवावी.
५)     मूळ कागदपत्रे जमा केल्यानंतर ती कागदपत्रे मिळाल्याची पोचपावती प्रत्येकाने घ्यावी.

स्टेट्‌स रिटेन्शनबाबत
आपल्याला मिळालेला प्रवेश मनासारखा आहे, समाधानी आहे, असे वाटत असल्यास माहिती पत्रकातील योग्य त्या नमुन्यातील फॉर्म भरून दिल्यानंतर आपला प्रवेश कायमचा निश्‍चित होतो. म्हणजेच फ्रिज होतो व आपल्याला पुढील फेरीत भाग घेता येत नाही. प्रवेश मिळाला, तो स्वीकारला व संबंधित फॉर्म भरून दिला नाही, याचाच अर्थ आपण पुढील फेरीमध्ये बेटरमेंटसाठी पात्र असता. बेटरमेंट मिळाली, पूर्वीचा प्रवेश आपोआप रद्द होतो, परंतु पुढील फेरीत बेटरमेंट मिळाली नाही, तर पूर्वीचा प्रवेश कायम राहतो, त्याला कोणताही धक्का लावला जात नाही.

अत्यंत महत्त्वाचे 
आपल्याला मिळालेला प्रवेश घेणे, स्टेटस रिटेन्शन न देणे व पुढील फेरीत उच्च विकल्पाची म्हणजेच बेटरमेंटची प्रतीक्षा करणे हाच प्रवेशासाठी योग्य मार्ग आहे. आपणास कोणताच विकल्प उपलब्ध झाला नाही, तर आपल्या नावापुढे ‘चॉइस नॉट अव्हेलेबल’ असे येते. तरीही आपण पुढील फेरीसाठी पात्र असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com