
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
निवड समिती कोणत्याही स्पर्धा मालिकेसाठी संघ निवडताना भविष्याचा विचार करत असते; पण तसे करत असताना विद्यमान स्थिती आणि खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेणे गरजेचे असते. श्रेयस त्याचा अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळला, त्यात त्याने अर्धशतक केले होते. आयपीएलमधील कामगिरी पाहता तो फॉर्ममध्ये नाही, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे फॉर्म, गुणवत्ता आणि क्षमतेविषयी श्रेयस सरसच आहे. तरीही श्रेयस नकोसा का झाला, यावर चर्चा सुरू आहे.