

ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
भटकंती म्हटली की आपल्याला ठरावीक प्रदेश आणि ठिकाणेच डोळ्यासमोर येतात; पण ‘डोळस भटकंती’ ही जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सीमा कधी पाहत नाही. महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातही अशीच काही दुर्लक्षित ठिकाणे दडली आहेत. तेलंगणा राज्याला लागून असणाऱ्या या जिल्ह्यात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. माहूरची रेणुकादेवी. हा भाग विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर येतो.