Cricketsakal
सप्तरंग
भारतीय संघाची अवघड परीक्षा
भारतीय संघ १९४७ पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आला आहे. त्यात फक्त नऊ कसोटी सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.
कसोटी सामन्यांची मालिका खेळायला ऑस्ट्रेलियात जाणं म्हणजे कोणत्याही पाहुण्या संघासाठी ती सर्वांत मोठी परीक्षा असते. खेळाच्या तंत्र कौशल्याबरोबर तुमच्या मानसिक कणखरतेचीही कठोर परीक्षा ऑसी खेळाडू आणि त्यांचे नाठाळ प्रेक्षक बघतात, हे सर्वांत मोठं आव्हान खेळाडूंना सर्वोत्तम खेळ सादर करायला प्रोत्साहित करतं.
