माेठी बातमी! 'वरईच्‍या पिठातून ३८ जणांना विषबाधा'; वडूज परिसरासह खटाव, माण तालुक्‍यांत खळबळ; नेमकं काय घडलं..

Food Poisoning Scare: बुधवारी दुपारपासून हा प्रकार उघडकीस आला आहे. वरईच्‍या तयार पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांशी रुग्णांना चक्कर येणे, मळमळ होणे, हातपाय थरथर कापणे, तर काही रुग्णांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे.
"Ambulances rush patients after 38 people suffer food poisoning from Varai flour in Vaduj region."

"Ambulances rush patients after 38 people suffer food poisoning from Varai flour in Vaduj region."

Sakal

Updated on

कातरखटाव: नवरात्रोत्‍सव उपवासासाठी खाल्‍ल्‍या जाणाऱ्या वरई पिठाच्‍या भाकरीमुळे खटाव तालुक्‍यातील वडूज परिसरात सुमारे ३८ जणांना विषबाधा झाली, तर माण तालुक्‍यातील गोंदवले, वाघमोडेवाडी, किरकसाल, नरवणे, शिरवली आदी गावांमध्‍येही काही जणांना याचा फटका बसल्‍याची घटना घडली. अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉ. बी. जे. काटकर हॉस्पिटल, तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य काही खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com