

“The 1967 Koyna earthquake: A dark night etched forever in Maharashtra’s memory.”
Sakal
-जालिंदर सत्रे
पाटण : काळेकुट्ट आभाळ दाटलेले आणि दिवसभर काम करून गाढ झोपेत असताना नैसर्गिक आपत्तीने घाला घालून होत्याचे नव्हते झाले. तो दिवस म्हणजे कोयनानगर परिसराला जमीनदोस्त करणारा ११ डिसेंबर १९६७ चा. ६.७ रिश्टर स्केलच्या प्रलयकारी विनाशकारी भूकंपाला आज तब्बल ५८ वर्षे पूर्ण होत आहेत. निरपराध १७४ लोकांचा व ९२६ पाळीव जनावरांचा या आपत्तीत बळी गेला. निसर्गाच्या उद्रेकामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या काळरात्रीच्या जखमा लोकांच्या मनात आजही कायम असून, त्यानिमित्त भूकंपाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.