
Young women urging police to activate Nirbhaya squads and promote self-defense training for better safety.
Sakal
सातारा: शहरातील महाविद्यालयाबाहेर टवाळखोर तरुणांच्या वाढत्या गैरप्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्भया पथके निष्क्रिय झाल्याने या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत. महाविद्यालयीन तरुणी सुरक्षित राहण्यासाठी ती सक्रिय करून, महाविद्यालये सुटण्याच्या वेळेस तैनात असावीत, अशी अपेक्षा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी व्यक्त केली.