सावधान! कोयनेतून कोणत्याही क्षणी पाणी येणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सावधान! कोयनेतून कोणत्याही क्षणी पाणी येणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरण आज (ता. २२) पूर्णक्षमतेने भरले. धरणातील पाणीसाठा 105.03 टीएमसी झाला आहे. राज्यासाठी वरदायिनी ठरलेले कोयना धरण सलग दहाव्या वर्षी पूर्णक्षमतेने भरले आहे. दरम्यान, धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन धरण व्यवस्थापनाने केले आहे. 

धरण भरल्याने शेतीसह सिंचन अन्‌ विजेचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक तीन हजार 308 क्‍युसेक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मागील वर्षापेक्षा यंदा पाऊस कमी झाला आहे. मात्र, तरीही कोयना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने 15 ऑगस्ट रोजी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले होते. 

धरणात आतापर्यंत 115 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून 19.65 टीएमसी विनावापर, तर पायथा वीजगृहातून 9.61 टीएमसी असे 29.26 टीएमसी पाणी नदीपात्रात सोडले आहे. एक जून 45.80 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com