शेतमालाच्या पॅकिंगची यंत्रणा देणार; बाळासाहेब पाटील

पणनमंत्री बाळासाहेब पाटील; कऱ्हाडला धान्य चाळणी, प्रतवारी यंत्रणेचा प्रारंभ
Balasaheb Patil packing system for agricultural products satara
Balasaheb Patil packing system for agricultural products satarasakal

कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या उसाबरोबरच सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा पीक घेण्याकडे कल वाढला आहे. शेतमालात कचरा, खडे असतील तर दर कमी मिळतो. शेतकरी व व्यापाऱ्यांची ही गरज विचारात घेऊन कऱ्हाडला पाच मेट्रिक टन प्रतितास क्षमतेची धान्य चाळणी, प्रतवारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यापुढे आता शेतमालाच्या पॅकिंगची यंत्रणा देण्यात येईल, अशी ग्वाही सहकार, पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे दिले.

येथील पणन महामंडळाच्या परिसरात धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते बोलत होते. वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, राज्य वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव रमेश शिंगटे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, जयंत पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, साळुंखे, वसंतराव पाटील, दयानंद पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी वखार महामंडळाच्या कामकाजाला गती दिली. वखार महामंडळाची एक हजार १९० गोदामे आहेत. यामध्ये पनवेल व सांगोला येथे शीतगृहे आहेत. गोदामांमध्ये शेतकऱ्यांना राखीव जागा उपलब्ध करून दिली जाते. महामंडळातर्फे शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर ५० टक्के साठवणूक आकारात सवलत दिली जाते. मालाची साठवणूक करून ७५ टक्क्यांपर्यंत अल्पदराने त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. कऱ्हाडला भविष्यात मालाचे पॅकिंग यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे.’’

श्री. तावरे म्हणाले, ‘‘दोन वर्षांत महामंडळाच्या एकूण ३० वखार केंद्रांवर ४५ नवीन आधुनिक गोदामांची उभारणी करण्यात आलेली आहे. महामंडळाकडील ३० गोदामांमध्ये भारतीय खाद्य निगम यांचा साठा व्यवस्थित व पारदर्शी पद्धतीने राहावा, याकरिता भारतीय खाद्य निगमने सुचविल्याप्रमाणे महामंडळामध्ये डेपो ऑनलाइन सिस्टम तयार करण्यात आली आहे. लॉकडाउन कालावधीत सर्व काही बंद असताना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाने खरेदी करण्यात आला.’’

महामंडळे फायद्यात यावी

राज्य वखार महामंडळाची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली. त्याअंतर्गत राज्यातील जिल्ह्या- जिल्ह्यात गोदामे आहेत. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे फायद्यात असलेले महामंडळ आहे. महामंडळाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामुळे हे फायद्यात आहे. सर्वच महामंडळे फायद्यात यावी, अशी टिपण्णीही सहकारमंत्री पाटील यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com