Bharat Patankar: विश्वास पाटलांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे: भारत पाटणकर; जातीयवादी साहित्यिकांच्या कळपात जाणे अयोग्य

Bharat Patankar Slams Vishwas Patil: अध्यक्ष झाल्याने तुमचे अस्तित्व कमी होणार असून, तुम्ही स्वत:ची पथ कमी करून घेतली आहे. तुम्हाला तुमचे अस्तित्व टिकवायचे असल्यास संमेलनाला जाऊ नये. हे संमेलन वैचारिक गुलामीचे असून, समाजाने या संमेलनावर बहिष्कार घालावा.
Bharat Patankar

Bharat Patankar

Sakal

Updated on

सातारा : विश्‍वास पाटील यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वीकारल्याने ते जातीयवादी व धर्मांध साहित्यिकांच्या कळपात सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी जातीयवादी वक्तव्य केल्याने जाहीर माफी मागावी व अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत साताऱ्याचे संमेलन हे विशिष्ट प्रवाहाच्या हाती गेल्याने शूद्र-अतिशूद्रांसह ब्राह्मण समाजातील जात व्यवस्थेला थारा न मानणाऱ्यांनी संमेलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com