

From Farm Waste to Fuel: Gadkari Backs Bioenergy Revolution for Farmers
sakal
खंडाळा : देशातील पैसा इंधनाच्या आयातीपोटी बाहेर जात आहे. हा पैसा देशाबाहेर न जाता तो शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे, हेच आमचे स्वप्न आहे. जैवकचरा आणि शेतीमालावर प्रक्रिया करून इंधन निर्मिती करणारे ''राज क्लीन एनर्जी''सारखे प्रकल्प देशातील अनेक प्रश्नांचे एकच उत्तर आहे. यामुळे गाव आणि शेतकरी समृद्ध होऊन आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.