'या' कारणासाठी BJP मुख्यमंत्र्यांना पाठवणार 75 हजार 'पत्र'

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackerayesakal

कऱ्हाड (सातारा) : भारत देश (India) हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. देशाचे स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित नसावं, हे राज्याचं दुर्दैव आहे. याची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (Bharatiya Janata Yuva Morcha) वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांच्या आदेशानुसार, संपूर्ण राज्यातून 75 हजार पत्रे मुख्यंत्र्यांना पाठण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ सातारा जिल्ह्यातील पोस्टात पत्रे टाकून करण्यात आल्याची माहिती युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर (Sudarshan Pataskar) यांनी दिली.

Summary

देशाचे स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित नसावं, हे राज्याचं दुर्दैव आहे.

पोस्टात पत्रे टाकण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सरचिटणीस प्रमोद शिंदे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विशाल कुलकर्णी, नितीन शहा, योगेश पवार, युवा मोर्चाचे सौरभ शहा, शैलेश गोंदकर, उल्हास बेंद्रे, गणेश कापसे, अभिषेक कारंडे आदी उपस्थित होते.

CM Uddhav Thackeray
काबूल विमानतळावरील आत्मघाती हल्ल्यात 'खोरासन'चा हात
BJP Yuva Morcha
BJP Yuva Morcha

श्री. पाटसकर म्हणाले, भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधने आपल्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभतं का? राज्यात युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही काम कराल यावरून सर्वांचा विश्वास उडाला आहे. मात्र, किमान देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तरी आपण लक्षात ठेवावा, एवढीच आपल्याकडून माफक अपेक्षा आहे, असं त्यांनी पत्रात म्हंटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com