
कऱ्हाड: आवाजाच्या भिंती लावल्या तरी त्याचा आवाज सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेतच ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाच्या भिंती लावून मोठ्या प्रमाणात आवाज सोडल्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात चार ते पाच कारवाया करून मंडळांना आणि आवाजाच्या भिंती चालकांना इशारा दिला आहे. त्याचा चांगलाच धसका जिल्ह्यातील गणेश मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आवाजाच्या भिंतीला पर्याय म्हणून आता पारंपरिक वाद्यांना पसंती दिल्याचे दिसत आहे.