

Eyes on Loan Waiver Rules: State Government Preparing New Relief Plan for Farmers
sakal
सातारा : महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तारीख जशी जवळ येत आहे, तशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का आणि कर्जमाफीचे नेमके निकष काय असतील? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.