मराठा समाजाला पात्रतेनुसार पूर्ववत इडब्ल्यूएस दाखले देण्यात यावे, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले.
कऱ्हाड - मराठा समाजाला पात्रतेनुसार पूर्ववत इडब्ल्यूएस दाखले देण्यात यावे, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले. प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, मुंबई उच्च न्यायालयाने महावितरणच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने एसईबीसी व इडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या वादाबाबत निकाल दिला आहे. त्या निकालानंतर माध्यमांनी मराठा समाजाचे इडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाल्याचा अर्थ लावून मोठा गैरसमज निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यातील तहसील कार्यालयांनी मराठा विद्यार्थी व उमेदवारांना अचानक इडब्ल्यूएस दाखले देणे बंद केले आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ महावितरणच्या नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण स्थगित केल्यामुळे त्या उमेदवारांना इडब्ल्यूएस कोट्यातून (पूर्वलक्षी प्रभावाने) नियुक्ती द्यावी, या शासन निर्णयाच्या विषयी निकाल दिलेला आहे. याचा अर्थ सरसकट संपूर्ण मराठा समाजालाच इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देऊ नये, असा होत नाही. यासाठी न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राचे सविस्तर वाचन करून खात्री करावी. त्यामुळे सर्व तहसील कार्यालयांना मराठा समाजाला इडब्ल्यूएस दाखले पुन्हा पूर्ववत देण्याच्या सूचना कराव्या. अन्यथा आंदोलन करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, याची नोंद घ्यावी, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.