
Heavy August rains wreak havoc on Satara’s Wai, Mahabaleshwar, and Karad; 142 farmers await compensation.
Sakal
सातारा: जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत १४२ शेतकऱ्यांचे २१.६० हेक्टरवरील पिकांचे तीन कोटी २३ लाखांचे नुकसान झाले आहे. वाई, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यांत जास्त नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे केले असून, बाधिताच्या भरपाईसाठी शासनाकडे अहवाल पाठवला आहे. जून, जुलैमध्ये मुसळधार पाऊस होऊनही खरीप पिकांचे नुकसान झाले नसल्याचे महसूल व कृषीच्या पंचनाम्याच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.