

Study shows declining grassland bird diversity in Pune and Satara regions, raising conservation concerns.
sakal
पुणे : हवामान बदलावर उपाय आणि हरित पट्टा वाढविण्याच्या उद्देशाने गवताळ प्रदेशांत (सव्हाना) मोठ्या प्रमाणावर केले जाणारे वृक्षारोपण हे पक्ष्यांच्या विविधतेवर परिणाम करणारे ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील १५ ठिकाणांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या संशोधनामुळे केवळ झाडे लावणे हाच योग्य उपाय नसून, नैसर्गिक गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाबाबत नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.