Kathav Rain Update: 'खटावला पावसाचा पुन्हा तडाखा'; मायणीचा साकव गेला वाहून, काढणीला आलेल्‍या खरीप पिकांचे नुकसान

Heavy Rain Hits Khatav Again; खटाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तालुक्यात घेवडा, सोयाबीन आदी खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तीन दिवसांपासून शेतात पाणी साचून आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
Mayani canal washed away in Khatav after heavy rains, leaving Kharif crops damaged.

Mayani canal washed away in Khatav after heavy rains, leaving Kharif crops damaged.

esakal

Updated on

कलेढोण : खटाव पूर्व भागात झालेल्या दोन दिवसांच्या पावसाच्या हजेरीमुळे रस्ते, शेती व बंधाऱ्याचे नुकसान झाले. त्यात मायणी (ता. खटाव) येथील मायणी बायपास रस्त्यास लागून असलेला श्रीनाथ मंदिर ते महादेव मंदिराकडे जाणारा साकव चांद नदीतील जोराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे अर्धवट वाहून गेला, तर मुळीकवाडी-पाचवड या रस्त्यावरील पुलाला पाण्याच्या प्रवाहामुळे भगदाड पडले, तसेच कलेढोणला पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com