

Pomegranate Boom in Man Taluka as Farmers Overcome Harsh Weather Challenges
Sakal
-शाल गुंजवटे
बिजवडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात सुरू झालेल्या पावसाने ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुक्काम ठोकत शेतकऱ्यांची झोप उडवली. कांदा शेतातच नासून गेल्याने रोटर फिरवावा लागला. मात्र, निसर्गाशी दोन हात करत डाळिंब लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी बहार यशस्वी करून दाखवले.
त्यातच डाळिंबाचे दर किलोला सरासरी शंभर ते २०० रुपयापर्यंत राहिले. त्यामुळे माण तालुक्यातील मार्डी, दहिवडी, बिदाल, बिजवडी, मोही, शिंगणापूर, भालवडी, खुटबाव व परिसरातील डाळिंब लागवडधारक शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.