बंदीची केवळ घोषणाच! 'कृत्रिम फुले बाजारात; फलोत्पादनमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणीच नाही'; शेतकऱ्यांच्या फुलांची मागणी घटली

No Action on Artificial Flower Ban: शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करून कमी कालावधीत चार पैसे चांगले मिळावे, यासाठी भाजीपाला, पालेभाज्या, फळे, फुले पिकवतात. त्यामुळे त्यांना उत्पन्नही चांगले मिळते. मात्र, अलीकडे बाजारपेठेत सण - विविध उत्सवात सजावटीसाठी प्लॅस्टिक फुले मोठ्या प्रमाणात येत आहेत.
Artificial Flowers Hit Farmers’ Demand Despite Official Ban
Artificial Flowers Hit Farmers’ Demand Despite Official BanSakal
Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड: सणा-सुदीला, विविध उत्सवांत सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कृत्रिम फुले बंद व्हावीत व फूल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती. त्यानंतर फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लॅस्टिक-कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी महिन्यापूर्वी केली होती. सध्या गणेशोत्सवामध्ये बाजारपेठेत राजरोसपणे कृत्रिम फुलांची विक्री सुरू आहे. त्यासंदर्भातील अध्यादेशच सरकारने काढला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com