
दहिवडी : ‘‘मी बारामतीशी, फलटणशी तडजोड केली असती, तर माझा राजकारणातील संघर्ष, त्रास कमी झाला असता. मात्र माण-खटावच्या जनतेला स्वाभिमानाने उभं करू शकलो नसतो, पाणी देऊ शकलो नसतो. त्यामुळे माण-खटावच्या मातीचा सुपुत्र कधी झुकला नाही, कधी वाकला नाही,’’ असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.