
सातारा : देशातील गरजू लोकांना घरे मिळावीत, या उद्देशाने केंद्र सरकार घरकुल योजना राबवीत आहे; परंतु या योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना जागेअभावी वंचित राहण्याची वेळ आली आहे. या योजनेत घरकुलासाठी पात्र असूनही चार भिंतीचा आसरा मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामध्ये एकूण योजनेच्या तुलनेत दीड हजारांहून अधिक लाभार्थ्यांना जागा उपलब्ध न झाल्याने घरकुलाची वाट पाहावी लागत आहे.