Satara : केवळ १५ टक्के सरकारी शाळेतच सीसीटीव्ही; अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण?

गेल्या काही महिन्यांत बदलापूर, पुणे, कोलकाता या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होऊ लागला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत सर्वच सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला होता.
satara School Security
satara School SecuritySakal
Updated on

-प्रशांत घाडगे

सातारा : राज्यातील विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश काढले होते. मात्र, या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या एकूण शाळांपैकी केवळ १५ टक्के सरकारी शाळेत सीसीटीव्ही बसविला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न पालक विचारत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com