
लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्या (गुरुवार) लोणंद येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. सोहळ्यातील वारकरी व भाविकांना स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, वीज, सुरक्षा आदी विविध प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, विविध संस्था व नागरिकांनी गेल्या १५ दिवसांपासून येथे अहोरात्र झटून जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे लोणंदनगरी माउलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. संपूर्ण सातारा जिल्हाच माउलींच्या स्वागतासाठी आतुरला आहे.