
सातारा : दुर्गम भागास जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६७ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक १९ शाळांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना सुस्थितीत इमारतींमध्ये शिक्षण मिळणार आहे.