Minister Makarand Patil: राज्यात अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा: मंत्री मकरंद पाटील; जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे

Excessive Rain in Maharashtra: भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सतर्क राहावे. शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
Minister Makarand Patil:
Minister Makarand Patil:Sakal
Updated on

सातारा: राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com