
सातारा: लातूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत बाधित झाले, ज्या ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, अशा ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवा. पुरानंतर येणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.