
MNS workers protest outside Satara Collector Office demanding ₹50,000 per hectare compensation for drought-hit farmers.
Sakal
सातारा : अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरणे पालकांना मुश्कील झाले आहे. याचा विचार करून शासनाने वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधीसह इतर सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.