
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात विविध लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागयत सुरुच ठेवली आहे. भारतीय नौदलात देखील सातारच्या दोन सुपुत्रांनी आपली चोख भूमिका बजावत पाकिस्तानच्या सेनेला चित केले होते.
सातारा : भारतीय नौदल इ. स 1934 मध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या 'रॉयल इंडियन नेव्ही' (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. इ.स 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर 'नौदल दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात विविध लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागयत सुरुच ठेवली आहे. भारतीय नौदलात देखील सातारच्या दोन सुपुत्रांनी देखील आपली चोख भूमिका बजावत पाकिस्तानच्या सेनेला चित केले. यामध्ये मूळचे ठोसेघरचे सीताराम गोविंद चव्हाण (वय ७२) व साता-यातील नॅशनल कमांडर विष्णू भागवत यांनी आपल्या कौशल्याने पाकिस्तानच्या सेनेला जेरीस आणले होते. सीताराम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण ठोसेघर येथे, तर माध्यमिक शिक्षण साता-यात झाले. तद्नंतर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे पूर्ण करुन नेव्हीत जाॅईन झाले. इलेक्ट्रीकल ट्रेडमध्ये ते नौदलाच्या बोटीत काम पाहत होते. शत्रूवर नियंत्रण ठेवण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्यासमवेत सातारा जिल्ह्यातील शेख हे देखील होते. १९६७ साली चव्हाण यांनी भारतीय नौदलात आपला ठसा उमटवत उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल भारतीय नौदलाकडून त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नौदलाच्या इलेक्ट्रीकल मशनरी हाताळण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारतीय नौदलात गेली कित्येक वर्षे सेवा बजावत असलेल्या चव्हाण यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे. सध्या चव्हाण हे नवोदित विद्यार्थ्यांना नौदलाचे धडे देत आहेत.
कुठल्याही देशात सैन्य दलाला अनन्य साधारण महत्त्व असते. सैन्य दलाच्या वेगवेगळ्या शाखाही असतात. पण, ज्या देशांना समुद्री किनारा आहे त्या देशातील नौदलाला तर खूप सर्तक राहावे लागते. आज 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन आहे. जगातील शक्तीशाली नौदलामध्ये भारतीय नौदलाचा सातवा क्रमांक आहे. त्यामुळेच आपले शत्रूराष्ट्र आपल्याला घाबररून राहतात. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निर्मिती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदल जगात सातव्या क्रमांकावर आहे.
जाणून घ्या नेव्हीचा इतिहास आणि नव्ही डे साजरा करण्यामागचे कारण...
भारतीय नौदलाविषयी महत्वपूर्ण महिती..