
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण आणि सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांला जोडणारा खंडाळा- कोरेगाव- रहिमतपूर- कऱ्हाड- सांगली- शिरोळ या राज्य मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या अनास्थेमुळे रखडले आहे. कोरेगाव ते पिंपोडे खुर्द येथील दोस्ती ढाबा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे यांनी दिला आहे.