हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे हे आक्रमक भूमिका मांडत आहेत. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचं विधानही नितेश राणे यांनी केलं होतं. याशिवाय हलाल आणि झटका मांस वादही सुरू झालाय. त्यांनी मल्हार सर्टिफिकेशनची घोषणा केलीय. हिंदुत्वाच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, राज्यात जातीय सलोखा ठेवला पाहिजे. अलिकडे दोन्ही बाजूचे लोक काहीतरी बोलत असतात. महाराष्ट्राला ही विधान सहन होणारी नसतात. त्यामुळे विधान करणाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे.