Ramraje Naik-Nimbalkar: विरोधकांच्या केवळ आयत्या पिठावर रेघोट्या; रामराजे नाईक-निंबाळकर;..अन्यथा नीरा-देवघर धरणच झालं नसतं

Neera Devghar dam issue: साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “विरोधकांच्या केवळ आयत्या पिठावर रेघोट्या; त्यांनी प्रत्यक्षात काहीच केले नाही,” अशा शब्दांत त्यांनी सडेतोड हल्ला चढवला.
Ramraje Naik-Nimbalkar

Ramraje Naik-Nimbalkar

Sakal

Updated on

आदर्की: नीरा- देवघर आणि धोम- बलकवडीचे पाणी आम्ही आणले, असे काही लोक सांगत आहेत; परंतु जर मुळात नीरा-देवघर धरणच झाले नसते, तर तुमच्या पाइपलाइनला पाणी आले असते का? १९९६ मध्ये मी आमदार झालो, तेव्हा कृष्णा लवादानुसार २००० पर्यंत पाणी अडवणे बंधनकारक होते. अन्यथा ते पाणी कर्नाटक आणि आंध्रला गेले असते. ती रात्र मला आठवते, जेव्हा मी या चिंतेने झोपू शकलो नव्हतो. आम्ही कष्ट उपसले, आज मात्र विरोधक आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करत आहेत,’ असे प्रतिपादन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com