विसापूर (जि. सातारा) : केंद्राचे अन्यायी कृषी विधेयक मागे घेऊन महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच्या तत्त्वावर नवे कृषी धोरण अवलंबले पाहिजे, यासाठी श्रमिक मुक्ती दलाने महात्मा फुले यांच्या मूळ गावी कटगुण येथे आज ठिय्या आंदोलन केले.
या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, डी. के. बोडके, ऍड. शरद जांभळे, सुधीर नलवडे, दिलीप पाटील, व्यंकटराव पन्हाळकर, ऍड. धम्मसागर भारती यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील प्रमुख कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.
दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले, "कृषी विधेयक मागे घेतलेच पाहिजे, ते मागे घेतले तरी शेतकऱ्यांचे शोषण संपणार नाही. त्यासाठी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकेला पाया मानून पर्यायी कृषी धोरण स्वीकारले पाहिजे. त्याची सुरवात या आंदोलनाने झाली आहे. ही भूमिका घेऊन हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पुढाकार घेईल.''
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.