केळघर : अवकाळी पावसामुळे जावळी तालुक्यातील भुतेघर मुरा येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे स्ट्रॉबेरी पीक मातीमोल झाल्याने भुतेघर मुरा येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी चक्क बांधावर टाकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.गेल्या चार दिवसांपूर्वी जावळी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. भुतेघर मुरा येथे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
येथील ३०ते४० शेतकऱ्यांनी विंटर, कामारोझा, नाबिया या जातीच्या स्ट्रॉबेरी ची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. जवळपास ५०ते ६०एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी ची लागवड करण्यात आली होती.मात्र अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी चे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे स्ट्रॉबेरी कुजून गेली असल्याचे शेतकरी विशाल मानकुमरे यांनी सांगितले. शेतातील स्ट्रॉबेरी अक्षरशः नासून गेल्यामुळे ही स्ट्रॉबेरी बांधावर फेकून द्यायची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आल्याचे श्री. मानकुमरे यांनी सांगितले.
येथील शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थकारण हे केवळ स्ट्रॉबेरी पिकावर अवलंबून असल्याने या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नुकसानीत क्षेत्राचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना शासनाने भरीव आर्थिक मदत करावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महाबळेश्वर तालुक्या बरोबरच जावळी तालुक्यात देखील स्ट्रॉबेरी चे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.मात्र महाबळेश्वर तालुक्यात पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. मात्र जावळी तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असून जावळी तील शेतकऱ्यांना ही पिकविम्याचा लाभ मिळाला पाहिजे.
- विकास मानकुमरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.