
Gramvikas Minister Jaykumar Gore addressing the Samruddha Panchayatraj Abhiyan workshop in Satara.
Sakal
सातारा : गावागावांतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी चळवळ उभी करून गावचा विकास हा अजेंडा गावकऱ्यांनी ठेवला पाहिजे. ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. देश मजबूत करायचा असेल, तर गावे समृद्ध झाली पाहिजेत, असे सांगत गावाच्या विकासात सर्वांना सोबत घेऊन प्रत्येकाने काम करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.