
सातारा: मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाशी संघर्ष करणारे अंतरवाली सराटीचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आझद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलन कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय तेथून मागे हटणार नाही, अशी भूमिका साताऱ्यातील मराठा समन्वयकांनी घेतली आहे.