Prime Minister Kisan
Prime Minister Kisansakal

Satara : ‘पंतप्रधान किसान’साठी शेतकऱ्यांची ससेहोलपट

योजना महसूलकडून कृषीकडे गेल्याचा परिणाम

कऱ्हाड : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची पुढील कार्यवाही आता महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे आता कृषी विभागामार्फत या योजनेची कार्यवाही केली जात आहे.

मात्र, या योजनेचे हस्तांतर होऊन अनेक दिवस झाले, तरीही महसूल विभागाकडून कृषी विभागाला लॉगीन आयडी आणि पासवर्डच देण्यात आलेला नाही. त्यामुळे खात्यात त्रुटी असणाऱ्या शेतकऱ्यांना महसूलकडून कृषीकडे पाठवले जात आहे.

मात्र, कृषी विभागात लॉगीन आयडी, पासवर्ड नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू असून, दोन्ही विभागांकडे हेलपाटे मारून शेतकरी वैतागले आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीच तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारद्वारे नोंदणीकरण तथा खात्याचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर जमा केली जाते. ही केंद्रीय योजना असून, देशातील सर्व भूमिधारक शेतकऱ्यांना कृषी, संबंधित कामासाठी साहाय्य करते.

या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते. त्या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजारांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात २००० रुपयांच्या तीन हप्त्यांत जमा केली जाते. योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात बळिराजाच्या खात्यात जमा होईल.

योजनेंतर्गत १३ वा हप्ता २७ फेब्रुवारीला खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठीची कार्यवाही महसूल विभागाने आतापर्यंत पार पाडली. त्यासाठी शेतकऱ्यांची कागदोपत्री कार्यवाही करून त्यांनी घेतली. त्या कागदपत्रात अनेक त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करून देण्यासह ज्यांची नावे आली नाहीत, त्यांची नावे का नाहीत, याबाबतचा पाठपुरावाही महसूलने केला.

मात्र, सध्या या योजनेची जबाबदारी महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे दिली आहे. त्यामुळे आता कृषी विभागाकडून ती कार्यवाही केली जाईल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाला त्यासंदर्भातील लॉगीन आयडी आणि पासवर्डच दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी महसूल विभागाकडे गेल्यावर त्याला कृषी विभागाकडे पाठवले जाते. तेथे गेल्यावर कृषी विभागाकडून लॉगीन आयडी आणि पासवर्डच दिला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकरी हेलपाटे घालत आहेत.

या आहेत अडचणी...

शेतकऱ्यांचे अनेकदा पीएम किसानचा हप्ता येत नाही, अनेकदा त्यांचे आधार कार्ड लिंक असूनही पैसे येत नाहीत, एकाच्या खात्यावर दुसऱ्याच कोणाचा अकाऊंट नंबर पडलेला असतो. त्यामुळे पैसे जमा होत नाहीत, काही शेतकरी मृत असतात. त्यांचे पैसे येतात, मात्र त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्याने वारसांना पैसे निघत नाहीत, यासह अनेक तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांना भेडसावतात.

पोस्ट बॅंकेत खाते उघडा...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होते. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी करून घ्यावे,

त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी, किंवा बँक खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत उघडावे. तेथे खाते काढल्यावर ४८ तासांत ती आधार संलग्न होऊन सक्रिय होतील. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झाले नाही, केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com