Sharad Pawar : ‘मविआ’ला ३० ते ३५ जागा मिळतील ; निवडणुकीच्या तीन टप्प्यांनी पंतप्रधान मोदी अस्वस्थ

महाराष्ट्रात मागील वेळी आम्हा विरोधी पक्षाला लोकसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. आता यावेळेस लोकांना बदल पाहिजे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सर्व मिळून ३० ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

सातारा : महाराष्ट्रात मागील वेळी आम्हा विरोधी पक्षाला लोकसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. आता यावेळेस लोकांना बदल पाहिजे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सर्व मिळून ३० ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला समर्थन देत आहेत, असा आत्मविश्‍वास शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या तीन टप्प्यांनी मोदींना अस्वस्थ केले असून, आता त्यांचा टोन बदलला आहे. धर्मांधवादी विचारांना घेऊनच काहीतरी बदल होईल, असे त्यांना वाटत असावे, असेही पवार म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेतील कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्रातील चित्र काय असेल, यावर पवार म्हणाले,

‘‘मागील निवडणुकीत आम्हा विरोधी पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळेस मात्र, महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या ३० ते ३५ च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. लोकांना बदल हवा आहे.’’

  • मतदानाचा कमी होणारा टक्क्याविषयी विचारले असता पवार म्हणाले, ‘‘पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यांतील मतदान मोदींना

  • अस्वस्थ करणारे असे दिसते. कारण मोदींनी आपला टोन बदलला असून, ते थेट मुस्लिम समाजाचा उल्लेख

  • करत आहेत. धर्मांधवादी विचार घेऊनच काहीतरी बदल होईल,

  • असे त्यांच्या मनात असावे.

  • जसजसे टप्पे पुढे जातील तसतसे त्यांचे स्थान सरकत चालले आहे,

  • अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे.’’

शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदी व राज ठाकरे एकत्र येत आहेत, यावर शरद पवार म्हणाले, ‘‘मोदींना कोणा कोणाची मदत हवी आहे, हे यातून दिसत असून, त्यांचा आत्मविश्वास कुठे गेलाय हे ही आता समजत आहे.’’

Sharad Pawar
Loksabha Election 2024 : ‘विरोधक’ आता एकाच व्यासपीठावर

इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की याबाबत मी तुमच्याकडूनच ऐकले आहे. ईव्हीएमसंदर्भात काही तरी माहिती हवी असेल, त्याशिवाय ते राष्ट्रपतींना भेटणार नाहीत. पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे भाकीत शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले होते. यावरून त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असे विचारले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र काम करत आहेत. हळूहळू अधिक एकत्र येऊन काम करावे, असे ठरले तर आश्चर्य वाटायला नको.’’

कार्यकर्त्यांना आनंद वाटतो...

सुप्रिया सुळे यांचे पुण्यात फटाक्याच्या आतषबाजीत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यातून त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे का, या प्रश्नावर पवार यांनी असा काही संबंध नाही. कार्यकर्त्यांना तसे वाटत असेल, तर आनंद आहे, असे सांगितले. दरम्यान, त्यांनी सातारा व बारामती लोकसभेच्या निकालाबाबत भाष्य करणे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com