
कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम बागेपाठोपाठ पालिकेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रातही सापांचा वावर वाढला आहे. चार महिन्यांत जवळपास आठ घोणससह वेगवेगळ्या जातीचे साप तेथे पकडले आहेत. कर्मचारी काम करतानाच साप दिसत असल्याने त्यांच्यात भीती निर्माण होत आहे. सर्पमित्रांनी पकडलेले साप नैसर्गिक अधिवासात सोडूनही अद्याप परिसरात सापांचा वावर असल्याची भीती आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे ५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या जिवाला घोर लागल्याची स्थिती आहे. पालिकेने त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.