Sugar Crushing Season : ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात; जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी नोव्हेंबरपासून गाळपास सुरुवात

सातारा जिल्ह्यात ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत किसन वीर, खंडाळा कारखाना आणि प्रतापगड-अजिंक्यतारा या तीन कारखान्यांनी गाळप उरकले आहे. उर्वरित कारखाने मार्चअखेरपर्यंत गाळप उरकण्याची शक्यता आहे.
Sugar mills in the district have begun their final phase of crushing operations, with 17 mills starting their operations from November."
Sugar mills in the district have begun their final phase of crushing operations, with 17 mills starting their operations from November."Sakal
Updated on

सातारा : ऊस गाळपाचा हंगाम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत किसन वीर, खंडाळा कारखाना आणि प्रतापगड-अजिंक्यतारा या तीन कारखान्यांनी गाळप उरकले आहे. उर्वरित कारखाने मार्चअखेरपर्यंत गाळप उरकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून ८२ लाख ३९ हजार ८१७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७८ लाख १० हजार ४८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सर्वाधिक सरासरी ११.२३ टक्के साखर उतारा सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे. सर्वाधिक १३ लाख ४० हजार मेट्रिक टन ऊस गाळप जरंडेश्वर साखर कारखान्याने केले असून, रयत अथणी शुगरने १२.०६ टक्के साखर उतारा घेत आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com